Advertisement

मुंबईतून ठाणे गाठा 15 ते 20 मिनिटांत

ठाणे विभागातील हे पहिलेच मॉडल आहे ज्याचा प्रवाशांना फायदा होईल.

मुंबईतून ठाणे गाठा 15 ते 20 मिनिटांत
SHARES

घोडबंदर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, 14 मे रोजी भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे अधिकृत उद्घाटन केले. नवीन चार पदरी उड्डाणपुलामुळे मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास वेळ 15 ते 25 मिनिटांनी कमी होईल, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. 

शिंदे यांचा असा विश्वास आहे की, हा प्रकल्प केवळ दैनंदिन प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार नाही तर एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यांनी असेही सांगितले की, यामुळे मुंबईच्या उत्तर उपनगरे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, नाशिक आणि अगदी गुजरातमधील कनेक्टिव्हिटी सुव्यवस्थित होईल.

शिंदे म्हणाले की ठाणे क्षेत्रातील हे असे पहिलेच मॉडेल आहे आणि एकदा मेट्रो सेवा सुरू झाली की प्रवाशांना या कॉरिडॉरवरून थेट मेट्रो स्थानकांवर प्रवेश मिळेल. या उड्डाणपुलामुळे केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) वाहतुक कोंडीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

"हा उड्डाणपूल ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करेल. सुरळीत, सुरक्षित आणि जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.



हेही वाचा

पालिकेच्या सफाई विभागात खाजगिकरणाचा घाट?

मेट्रो 9 विरार आणि वाढवन बंदरापर्यंत वाढवण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा