Advertisement

महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावासाचा इशारा

कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावासाचा इशारा
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसह काही भागात आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 19 ते 25 मे दरम्यान महाराष्ट्रासाठी हवामानाचा इशारा जारी केला आहे. 22 मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील हवामानावर लक्षणीय परिणाम होईल.

कोकण प्रदेशात, मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागांसह, या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारपासून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात 20 मे पर्यंत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास (किमी/ताशी) वेगाने वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

विभागानुसार, 22 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून पुढील रविवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल. कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवारी मुंबईत आभाळ भरून राहिले होते आणि हवामान उष्ण आणि दमट होते. सकाळी 8 ते 9 या वेळेत शहरात अनेक ठिकाणी 10 ते 20 मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. हवामान विभागानुसार हे वातावरण बुधवारपर्यंत कायम राहणार आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये 40-50 किमी/तास वेगाने वारे, वीज चमकणे आणि हलक्यापासून मध्यम पावसापर्यंत हवामान राहणार आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि पालघरमध्ये यलोऐवजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच सौम्य पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा असून तापमान व आर्द्रतेमुळे उकाडाही कायम राहणार आहे.

मुंबईतील पावसाची विभागनिहाय नोंद :

नायर रुग्णालय (दक्षिण मुंबई) : 14 मिमी

कुर्ला व पवई (पूर्व उपनगर) : 12 मिमी

खार पश्चिम : 20 मिमी (सर्वाधिक)

बांद्रा पश्चिम : 18 मिमी, l जोगेश्वरी : 16 मिमी

बीकेसी : 14 मिमी l मरोळ : 13 मिमी

आरे कॉलनी (गोरेगाव) : 11 मिमी

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत, फक्त कुलाबा केंद्रावर 8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली.



हेही वाचा

नवी मुंबईतील कोपरखैरणे होल्डिंग पॉन्डमध्ये बोटिंग सुविधा मिळणार

महाराष्ट्र सरकार 'सीप्लेन पर्यटन' पुन्हा सुरू करणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा