एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नाही, कारण... : राज ठाकरे

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. 7 मे बुधवारी रात्री एक ते दीडच्या सुमारासा हल्ला केला गेला.

सर्व देशभरातून आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या ऑपरेशनचे स्वागत केले आहे. मात्र यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नसल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

आपल्याकडे पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्यावेळेला मी ट्विट केलं तेव्हा सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना धडा शिकवायला पाहिजे, जो त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. युद्ध हे उत्तर नाही, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टॉवर पाडले, त्यांनी काही युद्ध नाही केलं, अतिरेकी ठार मारले, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचे सायरन वाजवणार पण ही गोष्टा का घडली याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पाकिस्तान अगोदरच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबार करणार आहात. 

प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला ते सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी इतकी वर्षे हजारो पर्यटक जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती. मला वाटतं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून कढणं महत्त्वाचं आहे. एअर स्ट्राईक करून लोकांना भरकटावून हा काही पर्याय किंवा हे उत्तर होऊ शकत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत. मला वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळतात, हे येतात कुठून या गोष्टींपर्यंत पोहोचा. शाळा-महाविद्यातील मुलांपर्यंत ड्रग्ज कसे पोहोचू लागलेत. या गोष्टींच्या खोलाता गेले पाहिजे. हे नाव देऊन भावनांचा विषय येत नाही, प्रश्न असा आहे की, तु्म्ही काय पाऊल उचलताय, असे ते म्हणाले. 

इतके दिवस जे काही कार्यक्रम झाले त्याची काही आवश्यकता नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंच्या मोदींच्या दौऱ्यावरही भाष्य केले.


हेही वाचा

भारताच्या Air Strike नंतर असदुद्दीन ओवैसी म्हणाले...

'Operation Sindoor' नाव का दिले? वाचा A टू Z माहिती

पुढील बातमी
इतर बातम्या