महाराष्ट्राच्या (maharashtra) 15 व्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे एकूण 158 राजकीय पक्ष निवडणूक (maharashtra vidhan sabha election) रिंगणात आहेत. सर्वाधिक 237 उमेदवार (candidates) हे बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत उतरवले आहेत.
त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने 200 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्याचबरोबर तब्बल 2086 अपक्ष (independents) उमेदवार राज्यभरात निवडणूक रिंगणात असून यात बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे.
राज्यात 2019 साली झालेल्या निवडणुकीत 125 राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदा ही संख्या 158 वर पोहोचली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (shiv sena) (ठाकरे) 95, काँग्रेस (Congress) 101, तर राष्ट्रवादी (शरद पवार) 86 जागा लढत आहे.
महायुतीत भाजप (bjp) सर्वात जास्त म्हणजे 149 जागाांवर, शिवसेना (शिंदे) 81, तर राष्ट्रवादी (अजित पवार) 59 जागा लढवत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा गट महायुतीचा घटक पक्ष आहे.
तरीही आठवले गटाचे 31 उमेदवार स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 288 पैकी फक्त 125 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले आहेत.
राष्ट्रीय पक्ष असलेला माकप केवळ तीन जागा लढवत आहे. मुस्लीम मतदारांवर प्रभाव असलेला एमआयएम हा पक्ष 17 जागांवर लढत देत आहे. माजी मंत्री महादेव जानकर प्रमुख असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या 93 जागा लढत आहे.
राज्याच्या राजकारणातील जुन्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत 16 उमेदवार दिले आहेत. तर 52 राजकीय पक्षांनी फक्त एकच जागा लढवण्यावर समाधान मानले आहे.
हेही वाचा